अलंग किल्ला Alang Fort – हा ४५०० फूट उंचीचा गिरीदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे.

नाशिक जिल्ह्यातील कळसूबाई डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने अत्यंत अवघड समजला जातो.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विभागातील सर्वात कठिण अशा किल्ल्यांची ही भटकंती. घोटीवरून भंडारदऱ्याला जातांना कळसूबाई शिखराच्या रांगेत अलंग, मदन आणि कुलंग असे तीन किल्ले लक्ष वेधून घेतात. घनदाट जंगल आणि विरळ वस्ती यामुळे हा परिसरातील भटकंती तशि त्रासदायक आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा. भरपूर पाऊस यामुळे हे दुर्गत्रिकुट तसे उपेक्षितच आहे.

Alang Fort, Alang Fort Trek, Alang Fort Trekking, Nashik

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. पाण्याची ११ टाकी आहेत. किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष आहेत. एक छोटेसे मंदिर आहे. किल्ल्यावरून आजुबाजूचा खूप मोठा परिसर दिसतो. पूर्वेला कळसूबाई, औंधचा किल्ला, पट्टा, बितनगड, उत्तरेला हरिहर, त्र्यंबकगड, अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबाचा गड, खुट्टा सुळका, रतनगड, कात्राबाई चा डोंगर हा परिसर दिसतो. किल्ल्याचा माथा फिरण्यास ४ तास पुरतात.

गडावर जाण्याच्या वाटा

आंबेवाडी मार्गे: अलंग किल्ल्यावर जाण्यासाठी इगतपुरी कसारा गाठावे. इगतपुरी/कसारा-घोटी-पिंपळनेरमोर या मार्गे आंबेवाडी गाठावी. घोटी ते आंबेवाडी अशी एस.टी. सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारन ३२ कि.मी. चे अंतर आहे. घोटीवरून पहाटे आंबेवाडी ला ६ वाजताची बस आहे. आंबेवाडीतून समोरच अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले दिसतात. गावातूनच अलंग आणि मदनच्या खिंडी पर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फारच दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. खिंडीत पोहचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला तर उजवीकडचा मदन किल्ला. येथून अलंगवर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.

१. एक वाट खिंडीतून समोरच्या दिशेने खाली उतरते. १ तासात आपण खालच्या पठारावर पोहचतो. येथून अलंगचा कडा डावीकडे ठेवत १ तासात आपण किल्ल्यावरून येणाऱ्या तीसऱ्या घळी पाशी पोहचतो. या घळतीच एक लाकडी बेचका ठेवला आहे. या बेचक्यातून वर गेल्यावर थोडे सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. पुढे थोडीशी सपाटी लागते. येथून डावीकडे कड्यालगत जाणारी वाट पकडावी. १० ते १५ मिनिटात आपण किल्ल्यावरील गुहेत पोहचतो. आंबेवाडीतून येथपर्यंत पोहचण्यास ८ ते ९ तास उलटून गेलेले असतात.

२. खिंडीतून डावीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर सोपे प्रस्तरारोहण केल्यावर काही पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गेल्यावर एक ८० ते ९० फूटाचा सरळसोट तुटलेला कडा लागतो. या कड्यावर प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येते. प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्या शिवाय या वाटेने जाण्याचे धाडस करू नये. यावाटेने किल्ला गाठण्यास ६ तास लागतात.

घाटघर मार्गे: किल्ल्यावर जाण्यासाठीची दुसरी वाट घाटघर वरून आहे. घोटी-भंडारदरा मार्गे घाटघर गाठावे. घाटघरहून अडीच तासात. किल्ल्याच्या तिसऱ्या घळीत ठेवलेल्या लाकडि बेचक्यापाशी पोहचतो.

उदडवणे गावातून: किल्ल्यावर जाण्यासाठी आणखी एक वाट आहे. ती भंडारदरा मार्गे उदडवणे गावातून पठारावर येते. पुढे क्रं. २ च्या वाटेला येऊन मिळते.

राहण्यची सोय

किल्ल्यावर राहण्यासाठी २ गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची सोय होते.

जेवणाची सोय

आपणच करावी

पाण्याची सोय

बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.

जाण्यासाठी लागणारा वेळ

आंबेवाडीतून ७ते ८ तास लागतात.

सूचना: किल्ल्यावर जाण्याच्या वाटा अवघड असल्यामुळे प्रस्तरारोहाणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे.