इगतपुरी परिसरात असणारी सह्याद्रीची रांग दोन दिशांना विभागली जाते. एक पूर्वेकडे तर दुसरी पश्चिमेकडे, पूर्वेकडे असणार्याव सह्याद्रीच्या रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. यात कळसूबाई ,अलंग, कुलंग,औंढा,पट्टा हे किल्ले येतात. तर पश्चिमेकडे असणार्याड रांगेत त्रिंगलवाडी,कावनई ,हरीहर,ब्रम्हगिरी,अंजनेरी हे किल्ले येतात.

Kavnai Fort, Kavnai Fort Trek, Kavnai Fort Trekking, Nashik

गडावरील पहाण्याची ठिकाणे

किल्ल्याचा दरवाजा आजही बर्याअपैकी शाबूत आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या हातालाच गुहा आहे. गुहेत ४ ते ५ जणांना राहता येईल एवढी जागा आहे. येथूनच माथ्यावर जाण्यास जागा आहे. गडमाथ्यावर पोहोचल्यावर दक्षिण भागात एक तलाव आहे. आजुबाजुला पडक्या वाड्यांचे अनेक अवशेष आहेत. गडाच्या पश्चिम भागात एक बुरुज आहे. बुरुजाच्या जवळच पाण्याचे टाके आहे. गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो. किल्ल्यावरून कळसूबाई रांग, त्र्यंबक रांग, त्रिंगलवाडी असा सर्व परिसर दिसतो.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

कावनई मार्गे :- कावनईला जायचे असल्यास इगतपुरीला किंवा घोटीला यावे. येथून कावनई गावाकडे जाणारी बस पकडावी. कावनई गाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. इगतपुरीहून अप्पर वैतरणाला जाणारी बस पकडून वाकी फाट्यावर उतरावे. वैतरणाकडे जाणारा रस्ता सोडून उजवकडची वाट पकडावी. या फाटयापासून १ तासाच्या चाली नंतर आपण कावनई गावात पोहचतो. गावात कपिलाधारातीर्थ नावाचा आश्रम आहे. गावात शिरल्यावर उजव्या हातालाच किल्ला दिसतो. किल्ल्याची एक सोंड गावात उतरलेली आहे, या सोंडेवरून चढत जायचे. अर्ध्या तासाच्या चालीनंतर वाट उजवीकडे वळते आणि चिमणीपाशी येऊन थांबते. पुढची चढाई चिमणीतूनच आहे. येथे सोपे प्रस्तरारोहण करून, आपण किल्ल्याच्या दरवाजापाशी येऊन पोहचतो. गावापासून इथपर्यंत पोहचण्यास १ तास पुरतो.

राहाण्याची सोय

किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहे यात ४ ते ५ लोकांची राहण्याची सोय होते.

पाण्याची सोय

किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. यात मार्च - एप्रिल पर्यंत पाणी असते.

जाण्यासाठी लागणारा वेळ

कावनई गावातून अर्धा तास लागतो.